बंद करा

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना

    केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी धारणी (अमरावती) व धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बाल मृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिने सुरु करण्यात आला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात वाढ होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात ४४९ प्रकल्प आणि नागरी क्षेत्रात १०४ प्रकल्प कार्यरत आहेत. केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी १,१०,५५६ मंजुर अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात ७३,११६ अंगणवाडी केंद्र व आणि आदिवासी क्षेत्रात १७,५७१ अंगणवाडी केंद्र तसेच नागरी क्षेत्रात १९,७९९ अंगणवाडी केंद्र व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत ७० अंगणवाडी केंद्र आदिवासी भागात मंजूर झाले आहेत.